HW News Marathi
Covid-19

साताऱ्यानं राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये अग्रेसर

सातारा | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊन काळात राज्यभरात विविध जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग दर सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. साताऱ्याचा सध्याचा कोरोनाचा संसर्गदर हा तब्बल 32.7 इतका आहे.

सातारा जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने 4 मे ते 10 मे असा लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, बाधित रुग्ण संख्या कमी होत नसल्यामुळे पुन्हा हा लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊन सुरु होऊन 15 दिवस झाले आहेत. सातारा जिल्हयात लॉकडाऊन सुरु करण्यापुर्वी 2200 ते 2500 या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, 15 दिवसाच्या कडक लॉकडाऊन कालावधीनंतर 1500 ते 1800 बाधित रुग्ण सापडत आहेत. मागील (48 तासात) 19 मे रोजी 2692 रुग्ण सापडले आहेत. यामधून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे.

साताऱ्याचा पॉझिटिव्हीटी दर राज्यात सर्वाधिक आहे. सातारा जिल्हयात सध्या 22099 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. सातारा जिल्हयाची लोकसंख्या 31 लाख इतकी आहे. मे महिन्याचा मृत्यु दर 2 टक्के इतका आहे. तर पॉझिटीव्हीटी दर 32.7 इतका असून तो राज्यात सर्वाधिक आहे. मृत्युदर वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे रुग्णालयात न जाता घरातच घरगुती उपचार करणे.

गृहविलगीकरणादरम्यान घरात कोरोना नियमांचे पालन न करणे. यामुळे पूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरता फिरणे. लॉकडाऊन सुरु करण्याआधी लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम ,भाजी मंडई या ठिकाणी झालेल्या गर्दी मुळे बाधित रुग्ण संख्या वाढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या

News Desk

सीरमच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी, नव्या वर्षात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे! – छगन भुजबळ

Aprna