HW News Marathi
महाराष्ट्र

चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव संजय राऊत मुंबईतच अडवणार!

मुंबई | कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते वादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत आहे. या वादळाने रौद्रवतार धारण केला आहे. रविवार सायंकाळपासूनच या वादळाचं स्वरुप तीव्र होताना दिसून आलं. सोमवार सकाळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईहून हे वादळ गुजरातला जाणार यावरुन भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव असून संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

दरम्यान, रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा बसला आहे. आज (१७ मे) मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली असून सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडत आहे.

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नाही, नितेश राणेंचा आरोप

News Desk

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

News Desk

चार महिन्यात चार डीजी निवृत्ती होणार

News Desk