HW News Marathi
महाराष्ट्र

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये २ बळी, भिंत कोसळून झाला मृत्यू

रायगड | तौक्ते चक्रीवादळचा रायगडला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि झाडांची पडझड झाली आहे. आज सकाळी भिंत कोसळून एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी असलेल्या आता दुसऱ्या महिलेचा देखील सुद्धा मृत्यू झाला आहे.

आज (१७ मे) सकाळी उरणमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर भिंत कोसळली. यात नीता नाईक यांचा मृत्यू झाला होता. तर सुनंदा घरत या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पोलादपूर आणि श्रीवर्धनमध्ये घरांचे नुकसान झाले आहे आणि पेण एसटी डेपोमध्ये सकाळी चक्रीवादळामुळे एसटी बसवर झाड पडून मोठीहानी झाली आहे. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बांधलेले शेडही उडून गेले आहे. समुद्र किनाऱ्यावर अजून वारा वेगाने वाहत असून 11 तास उलटून गेले तरीही वारा पाऊस कायम आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7,866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. तसेच जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर 12 मोठी झाडे पडली होती जी आता मार्गावरुन हलवून रस्ते मोकळे करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी; प्रवीण दरेकर

News Desk

HW Exclusive : “मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार”, भाई जगताप यांची मोठी घोषणा

Aprna

मेट्रो-३ च्या प्रकल्पावरुन पुन्हा एकदा फडणवीसांकडून सरकारची कानउघाडणी

News Desk