HW News Marathi
Covid-19

चक्रीवादळापेक्षा कोरोनाच्या वादळाला थांबवा, संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

मुंबई | अरबी समुद्रात घोंघावणारे ताऊते चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या १२ तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला डिवचले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचले.

चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं आहे. देशांमध्ये कोणाचे फोन टॅप होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील.

ही आता राजनैतिक बाब झाली आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते पटोले?

नाना पटोले यांनी काल ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते असा दावा केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016-17 साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता अभिषेक बच्चनदेखील कोरोनामुक्त !

News Desk

उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत सल्ला देण्याचा अधिकारच नाही !

News Desk

ईडीच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk