HW News Marathi
Covid-19

कोरोना चाचणी फक्त‘या‘ लोकांचीच होणार !

मुंबई | महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने आता कोरोना चाचण्यांसाठी नविन मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.ज्यानुसार आता जर रूग्णाला कोरोनाची लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, व्यापाऱ्यांना लक्षणे नसतील, तर त्यांच्या चाचण्या करू नका, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोना चाचणीसाठी मार्गदर्शक तत्वे

१) रुग्णालयात येण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अत्यावश्यक शस्त्रक्रियेच्या रुग्णांची चाचणी करण्यात यावी.

२) ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तिथे अँटिजन चाचणी करण्यात यावी, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

३) अँटिजनमध्ये निगेटिव्ह आलेले, पण लक्षणे असलेले नागरिक, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्कमध्ये असलेले आणि विदेशातून आलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, असं सरकारने आदेशात नमूद केलंय.

कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला लाळेचे नमुने घेऊन चाचण्या केल्या जात होत्या. यात एका चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो, तर अहवाल चोवीस तासांनंतर मिळतो. दरम्यान, गेल्या महिन्यापासून अँटिजन पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील हिंजवडी येथे विप्रोने उभारले कोरोना आरोग्य केंद्र

News Desk

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा

News Desk

मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुरलीधर मोहोळ यांची केली विचारपूस

News Desk