HW News Marathi
Covid-19

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक त्यांची काळजी घ्या?

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन १ जूननंतर उठणार का? काय सरकार निर्णय घेणार या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३० मे) जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी बोलताना सुरुवातीला एक महिन्यांनंतर आपण बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लोकांचे कौतुक आणि आभार मानले कारण दीड वर्ष लोकांनी स्वतःवर जो संयम ठेवला आहे त्याचं कौतुक केलं. तसेच, महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा गावाकडे जास्त रूग्ण वाढत असल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयोवृध्द लोकांना फटका बसला. त्यानंतर दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला फटका बसला त्यामूळे आता तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसू शकतो. त्यामूळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असं आवाहन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

  • कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक
  • खबरदारी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या
  • राज्यात लसीचा तुटवडा
  • मात्र, जूनपासून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार
  • लस पुरवठा वाढला की २४ तास लसीकरण
  • राज्यात २ कोटी २५ लाख लोकांचं लसीकरण पुर्ण
  • १८+ वयाच्या ६ कोटी लोकांचं लसीकरण करणार
  • महाराष्ट्र सुरक्षित रहावा यासाठी बंधनं
  • महाराष्ट्रात हवा तसा कोरोना आटोक्यात आला नाही
  • कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक
  • नव्या स्ट्रेनचा फैलाव वेगाने होत आहे
  • कडक नाही मात्र निर्बंध कायम राहणार
  • ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक कायम
  • नवे स्ट्रेन घातक, हे स्ट्रेन काबूत नाही
  • नव्या स्ट्रेनवर अजून नियंत्रण नाही
  • तिसरी लाट येणार पण कधी ते माहित नाही
  • ब्लॅक फंगसचं नवं संकट
  • म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत आहे
  • म्यूकरमायकोसिसवर टास्क फोर्स काम करत आहे
  • कोरोना काळात घरकामगार, मजूर यांना निधी
  • घरेलु कामगारांच्या खात्यात ३४ लाख जमा
  • ३३०० कोटींची तरतूद
  • राज्यात दरवर्षी वादळ आणि त्याचं संकट आहे, त्याचा सामना नागरिकांनी आणि प्रशासनाने उत्तम केला
  • किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार
  • राज्य सरकार केंद्राकडे मदत मागणार
  • नुकसान ग्रस्त लोकांना मदत करण्यास सुरुवात
  • केंद्र सरकार वादळग्रस्त लोकांना मदत करणार
  • भूकंपरोधक घरे बांधण्याचा प्रयत्न
  • NDRF च्या नियमांत बदल करणे आवश्यक
  • कोरोना काळातील लोखाजोगा तुमच्यासमोर मांडत आहे
  • कोरोना काळात मोफत धान्य वाटप
  • ५५ लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या
  • गरिबांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ६०,९६३ नवे रुग्ण तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला 

News Desk

आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे !

News Desk

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk