HW News Marathi
महाराष्ट्र

“तपासावेळी सारखं पोलीसांना फोन केला की राजकीय हस्तक्षेप वाटतो म्हणुन…”!

मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांकडून जोरात चौकशी सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती असल्याचं सांगितलं आहे. तर आम्ही तपासात कोणतीही मध्यस्थी करत नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांना अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे”.

अजित पवार यांनी यावेळी वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. “संजय राठोड गायब आहेत कोणी सांगितलं? आजच माझं यशोमती ठाकूरं, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे त्यामुळे लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल हे मी त्यांच्या कानावर घातलं आहे. राज्याच्या प्रमुखांनी निर्णय घेतला तर त्यांना तो समजलाच पाहिजे. सहकारी असल्याने त्यांना विश्वासात घेणं, माहिती देणं महत्वाचं असतं,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय

Aprna

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ‘हे’ निर्णय घेण्यात आले

swarit

मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच! 

News Desk