HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर संजय राऊत यांच्या याच विधानावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मिश्किलपणे टिका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच टीका केल्याचे पहायला मिळालय.

राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही

शिवसेनेच्या संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. तर उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टार्गेट करत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं,अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणविसांच्या ठाकरेंना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांना मी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांचं ट्विट

तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्राला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज

दरम्यान, राऊत यांनी सकाळीच मीडियाशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट,’ राजकीय चर्चांना उधाण!

News Desk

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडेंची मेट्रो – ३ प्रकल्पातून उचलबांगडी

swarit

HW Exclusive: विमाच न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

News Desk