HW News Marathi
महाराष्ट्र

हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे – सुधीर मुनगंटीवार

नागपूर | पूजा चव्हाणया तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर नॉट रिचेबल झालेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. संजय राठोड हे कुठे गेलेत, हे मी सांगू शकत नाही. ते वनमंत्री आहेत, ते दाट वन शोधत संशोधन करत असतील, अशी खोचक टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली.

ते आज (१८ फेब्रुवारी) नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकारमधील संघर्षावरही भाष्य केले. सरकारला विचारणा करण्याचा हक्क घटनेने राज्यपालांना दिला आहे. त्यामुळेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात सरकारला विचारणा केली, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मात्र, हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे. हे सर्वकाही स्वार्थासाठी सुरु आहे. १२ आमदारांच्या निवडीवरुन आम्ही कोर्टात जाऊ, असे सरकार सांगते. मात्र, सरकारमध्ये तेवढी धमक नाही, अशी टीका सुधार मुनगंटीवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, नितेश राणेंचा प्रहार  

News Desk

राज ठाकरेंचा भाऊबीजच्या मुहूर्तावर शिवतीर्थ प्रवेश

News Desk

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

News Desk