HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा पंतप्रधानांना विनंती करणार

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्स सोबत काल (११ एप्रिल) बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू करावा का, तो ८ दिवसांचा केला जावं की १४ दिवसांचा केला जावं, याबाबत चर्चा झाली आहे.

दरम्यान, टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबतच्या चर्चेत महत्त्वाचे मुद्दे मांडले. कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्लाही टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ३७२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर १९६२ जणांची कोरोनावर मात

News Desk

मानलं राव! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिवीर उत्पादनाचा परवाना

News Desk

आज देशात अनलॉक, तर ‘या’ राज्यात आणखी २ आठवडे वाढला लॉकडाऊन

News Desk