HW News Marathi
महाराष्ट्र

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

बीड | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब ही घटना घडल्यानंतर गावातून गायब होते. मात्र, आता काही दिवसानंतर अरुण राठोड यांचं कुटुंब गावात आलं आहे. अरुण यांच कुटुंब गावात परत आलं असलं तरी त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. दरम्यान,अरुण राठोड यांचं कुटुंब पुन्हा गावात आल्याने त्यांच्याशी एच.डबल्यू मराठीच्या आमच्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी बातचीत केली.

पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव आल्यानंतर अरुण आणि त्यांचं कुटुंब बेपत्ता झालं होतं. त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, काही दिवसानंतर अरुणचे कुटुंबीय आज गावात आले आहेत. मात्र, अरुण अजूनही बेपत्ता आहे. तो कुटुंबासोबत आलेला नाही. त्यामुळे अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी या बाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिपमधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला आहे. तसेच, सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईलीही देखील माहीत नसल्याचे त्यांनी एच.डबल्यू.मराठीशी बातचीत करताना सांगितले आहे.

अरुण राठोडच्या घरात झाली लाखोंची चोरी

अरुणचं कुटुंब आज घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.येत्या २५ तारखेला अरुणच्या बहिणीचं लग्न होतं. याची तयारी म्हणून घरात लाखोंचा ऐवज होता,असा खुलासाही या वेळी अरूणच्या आई मीराबाई यांनी केला आहे .घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या संकटात वाढ झालेली दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं – संदीप देशपांडे

News Desk

जवळपास १० महिन्यांंनंतर शाळेची घंटा वाजली, ५वी-८वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास आजपासून सुरुवात

News Desk

काही लोकं जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करतायत!

News Desk