HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचार : अनिल बोंडेसह १४ जणांना जामीन मंजूर; नेमका आरोप काय?

मुंबई। अमरावती हिंसाचार प्रकरणी माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांना काल (१५ नोव्हेंबर) अटक करण्यात आले होते. बोंडेंसह भाजपच्या १४ जणांवर दंगल भडकवणे आणि दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे या कलमा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अवघ्या काही तासा बोंडेंसह १४ जणांना जामीन देखील मंजूर करण्यात आला.
बोंडेंसह भाजपचे आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, मनपा गटनेता मनोज भारतीय यांना पोलिसांनी अटक केली. अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११ हजार गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बोंडारा अमरावती मधील सिटी कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.

ज्यांच्याकडे याकडे तलवारी आहेत, त्यांची झडती घ्या । बोंडे

बोंडेंनी हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी दाबला जाणार नाही. आणि हिंदू मार ही खाणार नाही. तसेच ज्यांच्या घरात तलवारी आहेत. त्यांची झाडाझडती घेऊन दाखवा, असे पोलिसांना आवाहन केले होते.

हिंसाचारासाठी जबाबदारी असलेल्या सोडणार नाही। यशोमती ठाकूर

तसेच अमरावती हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.त्याचप्रमाणे अमरावतीत १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबरला कोणती हिंसाचार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. आमरावती शहरात संचार बंदी लागू असून नागरीकांना दुपारी २ ते ४ या वेळेत मूलभूत वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”; कॅबिनेट बैठकीतील निर्णय

News Desk

शरद पवार उद्या दिल्लीत विरोध पक्षांची बैठक घेणार

News Desk

HW Exclusive : “हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं षडयंत्र, माझ्याकडे सगळे पुरावे”; रवी राणांचा गंभीर आरोप

Aprna