HW News Marathi
देश / विदेश

अमित शहांच्या ‘त्या’ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक पत्र

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काहीच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आता याची अत्यंत गंभीर दखल घेत आपल्या शिवसैनिकांना एक भावनिक पत्र लिहल्याचे वृत्त समोर आले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांसाठी लिहिलेल्या या पत्रात नेमके काय म्हणतात ? पाहूया

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसाठी लिहिलेल्या पत्रात नेमके काय ?

जय महाराष्ट्र !

बाळासाहेबांचा एक शिवसैनिक…

देशाचे गृहमंत्री असणारे श्री. अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे,हे जे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले त्या वेळेस नारायण राणे यांना सुद्धा हसू आवरले नसेल.कारण राणे त्यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले.

एक गुजराती माणूस महाराष्ट्रत येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणेसकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल.

आता शिवसेनेचे सर्वच विषय काही मराठी माणसाला भले पटत नसतील, पण 19जून 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली,तेव्हा विशेष करून मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात मराठी माणसाची परिस्थिती खूप वाईट होती. भाषांवार प्रांतरचने मुळे मुंबई मराठी माणसाला मिळावी,त्या साठी 105 मराठी माणसे हुतात्मे झाले.

पण मुंबई ची आर्थिक नाडी त्या वेळेस परप्रांतीयांच्या हातात होती. मराठी माणसा कडे तेव्हा कोणतेच उद्योग नव्हते,चांगले शिक्षण नव्हते त्यामुळे सरकारी नोकरीत मराठी माणूस खालच्या पदावर काम करत होताआणि ही सर्व परिथिती बघून वंदनीय बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे आणि त्यातून जी क्रांती झाली,त्याच नाव शिवसेना तो शिवसेनेचा सर्व इतिहास आपणा सर्वाना माहीतच आहे.

आणि तेव्हा शिवसेना आणि फक्त शिवसेनाच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर होती, म्हणून आज मराठी माणूस मुंबई शहरात ताठ मानेने उभा आहे, हे कोणीही नाकारू शेकत नाही. आता पिढी बदलत आहे, पण इतिहास मात्र बदलत नसतो.

जय महाराष्ट्र!!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला २ वर्ष मुदतवाढ द्यावी, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

News Desk

वाजपेयींच्या स्मृती जागवणारे १०० रुपयांचे नाणे

News Desk

विस्तारवादाचं युग संपलं, हे युग विकासवादाचं आहे

News Desk