HW News Marathi
महाराष्ट्र

“पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल”, अजित पवारांचा खोचक टोला

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (९ फेब्रुवारी) राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या कार्याच्या आठवणी सांगताना भावूक झाले होते. यावरुन आता सत्ताधारी पक्ष असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांकडून मोदींवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. नाशिक येथे आज (१० फेब्रुवारी) झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीवेळी ते संवाद साधत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं आहे त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. नाशिकमध्ये विकास कामांच्या आढावा बैठकीवेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल.” मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यावेळी गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेत का झाले नरेंद्र मोदी भावूक?

एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, आझाद यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या घराच्या परिसरातील बगीचा पाहून काश्मीरची आठवण होते, गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असं मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला ! भगिरथ भालकेंना मिळाली उमेदवारी ..

News Desk

भारिपच्या कार्यकर्त्यांची रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

News Desk

१५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

swarit