HW News Marathi
महाराष्ट्र

‘सामना’ नीट वाचा, आजच्या ‘सामना’मध्ये कॉंग्रेसचे नवे  नाना पटोलेंच्या ताकदीचे कौतुकच !

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या नावाची शुक्रवारी (५ फेब्रुवारी) अधिकृत घोषणा झाली आहे. या घोषणेच्या अवघ्या २४ तासांपूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याच पार्श्वभूमीवर, आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने राज्यातील या संपूर्ण स्थितीवर भाष्य केले आहे. “काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद ५ वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही”, असे म्हणत सामनामध्ये शिवसेनेकडून काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे शिवसेना नाराज आहे का ? याबाबत चर्चा सुरु असताना आज (६ फेब्रुवारी) संजय राऊत यांनी पुन्हा माध्यमांना प्रतिक्रिया देऊन या चर्चा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

* ‘सामना’ नीट वाचा. आजच्या ‘सामना’मध्ये कॉंग्रेसचे नवे नाना पटोलेंच्या ताकदीचे कौतुक केले आहे.

* नाना पटोलेंमुळे आता कॉंग्रेस पक्ष वाढण्यास मदत होईल. प्रत्येक पक्षाला मोठा पक्ष होण्याचा हक्क आहे, मग तो कोणता पक्ष असो.

* मला नाना पटोले चांगले ठाऊक आहेत. नाना ज्या पद्धतीने काम करतात त्याचा फायदा कॉंग्रेसला नक्कीच होईल.

* नाना पटोले यांनी विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला, तेव्हापासून ते प्रदेशाध्यक्ष होतील हे ठरलं होतं.

* महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत आहेत. पण हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. तरीही आता विधानसभेचे सभापतीपद आता तिन्ही पक्षांसाठी खुले आहे.

* कॉंग्रेसला ५ वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. आता नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने हे ३ पक्ष एकत्रितपणे सभापतीपदासाठी निर्णय घेतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्रत्येक क्षणी…”; पंतप्रधान मोदींच्या विमानातील ‘त्या’ फोटोवर पंकजा मुंडेंची कमेंट

News Desk

आता तर खेळ सुरु झाला आहे, अर्णब गोस्वामींचा मुख्यमंत्र्याना इशारा

News Desk

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे धरणे आंदोलन

News Desk