HW News Marathi
महाराष्ट्र

“ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती”, राऊतांची मिश्लिल टिप्पणी  

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा काल (३१ जानेवारी) साखरपुडा पार पडला. यावेळी फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीचा किस्सा मोठा गाजला. यावर आता खुद्द राऊत यांनीच भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे. ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती,अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी कन्या पूर्वर्शी हिचा साखरपुडा रविवारी संपन्न झाला. या समारंभाला राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही या समारंभाला आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून संजय राऊत यांनी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत दूषित पाणी पुरवठ्यामुळे काविळची साथ

News Desk

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही – राजेश टोपे

News Desk

परमवीर सिंग यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करा !

News Desk