HW News Marathi
देश / विदेश

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

मुंबई | “चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत जे बोलले ते त्यांचे एका प्रश्नाला दिलेले उत्तर होते. प्रत्यक्षात आमच्याकडून शिवसेनेला किंवा शिवसेनेकडून देखील आम्हाला तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही”, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (२८ जुलै) स्पष्ट केले आहे. दरम्यान, “राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. मात्र, आम्ही एकत्र यायची जरी वेळ आली, तरीही आम्ही यापुढे निवडणुका मात्र एकत्र लढणार नाही”, असे मोठे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटलांचे हे विधान पूर्णपणे खोडून काढले आहे.

“शिवसेनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले ते केवळ विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर होते. पुढच्या निवडणुका या आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे, आम्ही शिवसेनेला तसा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. त्याचप्रमाणे, शिवसेनेकडूनही आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही”, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची काल (२७ जुलै) पहिली बैठक पार पडली. यावेळी “महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा”, असे निर्देश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले.त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.

“शिवसेना सध्या हवेत आहे. ते आता सोबत यायला तयार होतील असे वाटत नाही. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात. त्यामुळे, जर आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच घेईल. आम्ही एकत्र आलो तरीही निवडणुका वेगळ्याच लढवणार”, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची वारी शिवाजी पार्कच्या दारी!

News Desk

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शिवसेनेने १०० जागांवर लढण्याचे दिले संकेत

News Desk

आनंदी राष्ट्रासाठी विकासाचे प्राधान्य ठरविणे महत्वाचे !

News Desk