HW News Marathi
राजकारण

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

कणकवली | “राज्यातील या नव्या सरकारमध्ये मंत्री नाहीत, खाती नाहीत. कोकणात कुठेही या तीन पक्षांच्या सरकारचे अस्तित्व दिसत नाही. कोकणातील सर्व विकासकामे ठप्प पडली आहेत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेले हे पाहुणे सरकार फार काळ टिकणार नाही”, असे म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. ते आज (८ डिसेंबर) कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी, शिवसेना खासदारांकडून बेकायदा बैठकी घेतल्या जात असल्याचा आरोपही राणेंनी यावेळी केला आहे.

“राज्याच्या नव्या सरकारचे कोकणात कोठेही अस्तित्व दिसत नाही. कोकणातील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेले हे सरकार ‘स्थगिती सरकार’ आहे. आपल्या आर्थिक नफ्याकरिता या सरकारकडून विकासकामांना स्थगिती दिली जात आहे”, अशीही टीका यावेळी नारायण राणेंनी केली. त्याचप्रमाणे, येत्या १५ ते १८ डिसेंबरदरम्यान जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भाजपचे नेते सिंधुदूर्ग दौऱ्यावर असणार असल्याची माहिती यावेळी नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी मतांच्या राजकारणासाठी कलम ३७० हटविण्यास विरोध केला !

News Desk

मावळमधील पराभवामुळे फिका पडला बारामतीचा विजयोत्सव

News Desk

अमृतसरमधील रावण दहन आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करा !

News Desk