HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य नाही, निलेश राणेंची जहरी टीका!

मुंबई | भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट पुन्हा केले आहे. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील या संजय राऊतांच्या भाकितावरून निलेश राणेंनी चिमटा काढला आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “उद्धव ठाकरे हे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. सध्या ते एक शहर सांभाळू शकत नाहीयेत. हे सरकार कुबड्यांवर चालतं आहे.उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं करेल,” असा घणाघाती टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीये.

 

उद्धव ठाकरे हे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवत आहेत, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, जर ठाकरे पंतप्रधान झाले तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा ठरेल आणि देशाचं वाटोळं लावेल, अशी जहरी टिका राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ३,४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

“पवारांनीच मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला!”

News Desk