HW News Marathi
महाराष्ट्र

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

मुंबई | देशातला शेतकरी गेल्या एक महिन्यापासून देशात नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राला निशाणा करत टोला लगावला आहे. काल (२२ डिसेंबर) महाराष्ट्रासह मुंबईतही शेतकऱ्यांची आंदोलने झाली. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी तीन काळ्या विधेयकाच्या विरोधात एक महिन्यापासून दिल्लीच्या थंडीत आंदोलन करत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही आणि कुटुंबाचीही चिंता नाही. आतापर्यंत १२ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ठिकाणी मृत्यू झाला. तर एका संताने आत्महत्या केली आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याची टीका संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

“आपण देशात जय जवान जय किसान म्हणतो. देशात मात्र जवानाच्या हौतात्म्याच्या बातम्या येत आहेत तर शेतकरी आत्महत्या करत आहे ही स्थिती आहे. जरी या देशाचा कणा शेतकरी असेल तरीही सरकार मात्र काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा कणा मोडून टाकण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. म्हणूनच सरकारला विनंती आहे की अहंकार बाजूला ठेवा. शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत त्यांच्याशी चर्चा करा”,असे संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंत्यविधीसाठी स्माशानभूमीला जागा नसल्याने चक्क प्रेत केज तहसीलसमोर ठेवले

Aprna

हिंगणघाटमधील मृत बहिणीला वाचवू शकलो नाही !

swarit

“नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही?”, अजित पवारांचा परखड सवाल

News Desk