HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून आजचा ओबीसी आरक्षणासाठीचा हा शेवटचा मोर्चा – समीर भुजबळ

औरंगाबाद | ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी औरंगाबादेत आज माजी खासदार आणि ओबीसी नेते समीर भुजबळ यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान समीर भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. आजचा मोर्चा शेवटचा असून यानंतरचे सर्व मोर्चे रद्द करण्यात आल्याचं समीर भुजबळ यांनी यावेळी जाहीर केलं आहे.

समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितलं की, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन महाविकास आघाडी सरकारनं दिलं आहे. त्यामुळे हा मोर्चा सरकारचं आभार मानणारा असून यानंतरचे सर्व मोर्चे रद्द करण्यात आले आहेत

औरंगाबादेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समीर भुजबळांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी समीर भुजबळ यांनी सांगितलं की, अखिल भारतीय समता परिषद राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढत आहे. परंतु गेल्या आठवड्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होतं. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला थोडाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांवर निवडणुक आयोगाने कारवाई करावी, माजी आमदाराची मागणी!

News Desk

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना

News Desk

सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा – अॅड. डॉ. सुरेश माने

News Desk