HW News Marathi
महाराष्ट्र

पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात ‘नो एन्ट्री’, शरद पवारांची भूमिका!

उस्मानाबाद | मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता परत पक्षात घेणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी काल (१९ ऑक्टोबर) पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतला. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पद्मसिंह पाटील हे पवारांचे जवळचे नातलग आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राणा जगजितसिंह हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खा. पवारांच्या आजच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, पद्मसिंह पाटील यांचे नाव घेताच शरद पवारांनी कोपरापासून हात जोडले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपने स्वत:च्या विरोधात आंदोलन करावे – बाळासाहेब थोरात

News Desk

भाजपकडून निलेश राणेंवर ‘ही’ जबाबदारी

News Desk

पाणी प्रश्नावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची जलसंपदा अधिकाऱ्याला शिवीगाळ

News Desk