HW News Marathi
देश / विदेश

कांजुरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी -संजय राऊत

मुंबई | आरेचं जंगल वाचवणं यात कुठला अहंकार हे तर राष्ट्रीय कर्तव्य, हा तर केंद्र सरकारचाच कार्यक्रम, वाघ वाचवा, नदी वाचवा, जंगल वाचवा, हा मोदी सरकारचा कार्यक्रम, ही लढाई सुरुच राहील, महाष्ट्रातील सरकार आलं नाही याचं राजकीय दु:ख मी समजू शकतो, पण अशा प्रकारे केंद्राच्या अख्त्यारीतल्या यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

प्रकाश आंबेडकरांचं एक विधान फार महत्त्वाचं आहे, त्याबाबत त्यांचं अभिनंदन, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला विरोधी पक्षाने राजकीय विषय केलाय, त्यात न्यायालयाने पडू नये, जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे, आता मीठागरवाले आलेत कुठून, न्यायालय यात कशासाठी पडतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

कांजुरच्या जागी कोणी राजकारणी बंगले, फार्महाऊस बांधणार नाहीत, हा मुंबई, महाराष्ट्र आमि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे, त्यावर अशा प्रकारे निर्णय येणे चुकीचं, याच जमिनीवर पूर्वीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबवणार होतं, म्हणजे जमिन सरकारचीच आहे ना?

यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, सरकारला बदनाम केलं जात आहे, जनतेवर आर्थिक बोजा वाढत आहे, ज्या गोष्टीत न्यायालयाने पडायला हवं, न्याय द्यायला हवा, अशी असंख्य प्रकरणं देशात आहेत, तिथे लोक तारीख पे तारीख करुन झिजत आहेत, पंजाबमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत, काल एका संताने आत्महत्या केली, न्यायालयाने आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजे, महाराष्ट्रातील सरकार भाजपचं नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशा शंका सध्या लोकांच्या मनात येत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाल किल्ल्यात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा

News Desk

राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये, उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ जणांना घेतलं ताब्यात

News Desk

बळजबरीने चुंबन घेणाऱ्याची जीभ छाटली

News Desk