HW News Marathi
महाराष्ट्र

पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल !

मुंबई | ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा एकसूत्री कार्यक्रम ठरविण्याचे काम सुरु आहे. तीन पक्षांची चर्चा सुरु आहे. राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागत असल्याचे राऊतांनी आज (१५ नोव्हेंबर) घेतल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

वेगळ्या विचारधारेच्या पक्षांच्या सरकारबदद्ल बोलताना राऊत यांनी वाजपेयी व ‘पुलोद’च्या प्रयोगाचे दाखले दिले. ‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुद्धा वेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी देश चालवला होता. इतकेच काय, एकेकाळी शरद पवारांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. अशी सरकारे देशात अनेकदा बनली आहेत. त्यामुळे तशी कुठलीही अडचण होणार नाही,’ असे राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार! – राजेश टोपे

Aprna

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं – किरीट सोमय्या 

News Desk