HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज्यपाल ‘मातोश्री’वर

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे सोमवारी (१६ जून) मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांच्या निधनानंतर पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. दरम्यान, राज्यपालांनी कालच मुख्यमंत्र्यांना सांत्वनपर पत्र लिहिलं आपण ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांचा दुःखात सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज मातोश्रीवर जाऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.

रश्मी ठाकरेंच्या वडिलांची तब्येत काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे, त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात सोमवारी (१५ जून) त्यांचे निधन झाल्याची माहिती आली. रश्मी ठाकरे यांच्या वडिलानांच्या निधनाच्या वृत्तानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. याचसोबत राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना सांत्वनपर पत्र लिहिले होते. त्यानंतर, याच पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी ‘मातोश्री’वर त्यांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सामना’च्या अग्रलेखातील गलिच्छ भाषेबाबत चंद्रकांत पाटील रश्मी वहिनींना पत्र लिहिणार

News Desk

पुन्हा होणार राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांची भेट?

News Desk

“वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाईंना फोन करतो”, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk