HW News Marathi
राजकारण

भाजपवरचा आरोप चुकीचा, खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही !

मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून मागे हटण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, नुकताच फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणले कि, “शिवसेना पक्षप्रमुखांच्या मुलावरती म्हणजे माझ्यावरती पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचे आरोप केले. खोटारडेपणा मान्य करत नाही तोपर्यंत चर्चा नाही. मला खोटं ठरवणाऱ्यांशी बोलणार नाही.” दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुखांचे हे आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

  • भाजपला सत्तेवर नाही, सत्यावर प्रेम.
  • खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • सत्तेत राहून आतापर्यंत इतर मित्रपक्षांनी टीका केली नाही.
  • जनतेला वेठीस धरण्याची भूमिका शिवसेनेने घेतली.
  • आम्हाला फक्त विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे
  • आमच्यासाठी राममंदिर महत्त्वाचे
  • भाजपवरचा खोटारडेपणाचा आरोप चुकीचा
  • पहिल्याच दिवशी शिवसेनेकडून पर्यायाची भाषा का ?
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा ही गांधीजींचीच इच्छा !

News Desk

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk