HW News Marathi
महाराष्ट्र

मी ‘सामना’शिवाय दुसरे काही वाचत नाही !

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून घमासान सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज भाजप टीकास्त्र सोडत आहे. राऊत आज (४ नोव्हेंबर) राज्यापालांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली आहे. ‘तरुण भारत’च्या ‘उद्धव आणि बेताल’ या संपादकीयतून शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाहीत, तसेच मी ‘सामना’शिवाय दुसरे काही वाचत नाही. एवढी वृत्तपत्र येतात, कुठे वाचणार. अशाप्रकारचे वृत्तपत्र आहे हे मला माहित नाही”, असे म्हणत राऊतांनी पत्रकार परिषदेत तरुण भारतच्या टीकेला उत्तर दिले.

राज्यभालांची भेट ही सदिच्छा भेट आहे. भगतसिंह कोश्यारी हे अनुभवी नेते आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केले आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच,” असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तरुण भारतचे संपादकीयमधील शिवसेनेवर टीका

आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही, अशा शब्दात संजय राऊत आणि शिवसेनेवर केली आहे. संजयने दृष्टी देण्याचे काम केले पाहिजे, पण संजयच धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राने चिंतीत होणे स्वाभाविक आहे. ‘बेताल’ जर खांद्यावरुन उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात ज्या फांदीवर बसलो आहोत, कापणाऱ्याला लाकूडतोड्या नाही तर ‘शेखचिल्ली’ म्हणतात, याचे भान शिवसेनेला असेलच, अशा शब्दात संजय राऊत आणि शिवसेनेवर तरण भारतच्या संपादकीयमधून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नायगाव येथे विज पडून दोघांचा मृत्यू तर दोनजण जखमी

News Desk

“मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, विमानतळावर केलेला गरबा बरंच काही सांगतं”; सचिन सावंत

News Desk

आज अधिवेशनात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मंजूर होणार का?

Arati More