HW News Marathi
Covid-19

…तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई | देशात अनलॉक १ आणि महाराष्ट्रात मिशन बिंग अगेन अनंतर्गत सर्व हळूहळू सुरू करण्यात आले. यात केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक नियम शिथिल केले आहे. मत्रा, रस्ते आणि बाजारात लोक मोठी गर्दी करताना दिसत आहे. लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येणार आहे. परंतु संकट अजूनही टळलेलं नाही त्यामुळे नागरिकांनी अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, लॉकडाऊन करावे लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचे पालन करा, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१० जून) मंत्रालयातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच हळूहळू यात शिथीलता आणली जाईल. जगभरात कोरोनासोबत जगायला शिका, असे म्हटले जाते, तसेच आपल्याला करावे लागेल. बाहेर पडून आरोग्यासाठी व्यायाम करायला सांगितले. पण पहिल्या दिवशीची गर्दी पाहून धाकधूक वाढली. मात्र, बाहेर आरोग्यासाठी पडायचे आहे, खराब करण्यासाठी नाही. जर अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचे पालन करा,” असे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे जनतेने विनाकारण गर्दी करू नका, मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करू नका. राज्यातील जनतेने गर्दी होणार नाही, यांची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कुठेही गर्दी होता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

News Desk

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ! चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

#Coronavirus: आज राज्यात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk