HW News Marathi
महाराष्ट्र

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे 2 दिवसांत पंचनामा करण्याचे आदेश

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा आणि प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ , साधन सामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज (३ जून) निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे. विशेषत: मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या नशिबामुळे चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारी ठेवावी लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

News Desk

“एकदा का उद्रेक झाला तर कोणी रोखणार नाही”, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन उदयनराजे झाले आक्रमक 

News Desk

विजय वडेट्टीवारांच्या साधूंबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, पक्षाचा लवकरच सफाया होईल असा भाजपचा इशारा

News Desk