HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनावर आजवर केलेली मेहनत फटाक्यांमुळे वाया घालवू नका, मुख्यमंत्र्यांचे दिवाळीनिमित्त आवाहन

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज (८ नोव्हेंबर) जनतेशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, या आधी जे सण साजरे केले गेले त्यासाठी देखील लोकांनी जे सहकार्य केले त्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विषेशत: गर्दीत जाताना लोकांना काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाचे म्हणजे दिवाळीचा सण येत आहे. यावेळी काय काळजी घ्यावी यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. सार्वजनिक ठिकाणी फाटके वाजवू नका, जास्त प्रदुषण कसे होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण दिवाळीनंतरचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहे. प्रदुषणामुळे कोरोना जास्त पसरण्याची भीती आहे. त्यामुळे समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, युरोपात कोरोनाची दुसरी लाट नाही तर त्सुनामी आली आहे, असे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळी साधेपणाने साजरी करण्याची विनंती केली आहे.

दिल्लीत आकडा वाढत आहे. पाश्चिमात्य देशात आकडा वाढत आहे. प्रदुषणामुळे हा विषाणू आपल्या फुफ्फुसावर परिणाम करतो. प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणं टाळा. प्रदुषण करणारे फटाके टाळा. राज्य सरकार फटाक्यांवर बंदी आणू शकतं, पण स्वत:हून निर्णय घ्या, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा सुपुत्र कौस्तुभ राणे काश्मीरमध्ये शहीद

swarit

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली – राम कदम 

News Desk

“…. आरक्षण द्यावे नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही” – रावसाहेब दानवे

News Desk