HW News Marathi
महाराष्ट्र

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! भाजपचा सेनेवर वार

मुंबई | पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून शिवसेना विरुद्ध भाजप अशी शाब्दिक वादावादी होताना दिसत आहे. याच प्रकरणावरून भाजपनं आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावरही टीकेचा बाण सोडला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…,” असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

“त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?,” असं टीकास्त्र शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर डागलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भावात जुंपली!

News Desk

महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

Aprna

मराठा क्रांती ठोक मोर्चा मैदानात…तुळजापुरात जागर मोर्च्याला सुरुवात

News Desk