HW News Marathi
राजकारण

मी २० वर्षे तिकडे होते, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका !

मुंबई ।“विरोधकांनी काय काम केले ? विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. मी २० वर्षे तिकडे होते. त्यामुळे मला तिथली माहिती आहे”, असे आवाहन काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचाराकरिता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्र वाघ बोलत होत्या.

“लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत.तुम्हाला रामराज्य पाहिजे. राम शिंदे यांनी विकासकामे केली आहेत. त्यानंतर ते जनतेकडे मते मागत आहेत. त्यांच्या कामाची उतराई म्हणून मतदान करा. पण विरोधकांनी काय कामे केली ? मी २० वर्षे तिकडे होते. त्यामुळे, मला माहित आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही आश्वासनांना, भूलथापांना बळी पडू नका”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत ?

News Desk

एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट देणार

Aprna

दिवाळीनिमित्त मुंबईत किल्ले बांधणीला उस्फुर्त प्रतिसाद

swarit