HW News Marathi
राजकारण

गेल्या २ दिवसांमध्ये घडलेल्या सर्व घटना नाट्यमय !

मुंबई | “गेल्या २ दिवसांमध्ये घडलेल्या सर्व घटना नाट्यमय होत्या”, असे म्हणत भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनामा प्रकरणावर भाष्य केले आहे. “आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार हे २४ तास अज्ञातवासात होते. मात्र, दुसरीकडे आपण पुणे, बारामतीतील पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता यात काय खरं ? काय खोटं ? ते त्यांनाच माहित”, असे म्हणत गिरीश महाजन यांनी या प्रकरणी शंका व्यक्त केली आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून याची चौकशी सुरु आहे. निवडणूक आहे म्हणून सोडून द्या, असे म्हणून कसे चालेल ?”, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी होणारी ही कारवाई ईडी न्यायालयाच्या आदेशानुसार केली जात आहे. आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. या प्रकरणाशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना देखील या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या ७ वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कधी ना कधी त्यांची देखील चौकशी होणारच होती. यापूर्वी तेच सर्वोच्च न्यायालयात गेले होते मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आहे म्हणून सोडून द्या, असे म्हणून कसे चालेल ?”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जात पडताळणीवरुन उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट, लवकरच करणार काँग्रेस प्रवेश

News Desk

कोणाची कॅालर तर कोणाच्या मिशा, हीच आहे का सातारच्या प्रचाराची दिशा ?

News Desk