HW News Marathi
महाराष्ट्र

गलिच्छ स्तराच्या राजकारणामुळे अजित पवारांनी दिला राजीनामा | शरद पवार

पुणे | महाराष्ट्र सहकारी बँके घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२८ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र, कुटुंबप्रमुख माझी जबाबदारी आहे. त्यामुळे यामागची कारणे जाणून घेतली जातील, असेही पवार यावेळी बोलले.

पवार म्हणाले की, “अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल मला काहीही माहिती नव्हते. आजच अजित पवार यांनी आपल्या कुटुंबात सांगितले की, सहकारी संस्थेत मी काम करत असताना काही कारणांनी सहकारी संस्था अडचणीत आल्या. यामध्ये त्यांचे नाव घेतले गेले आणि त्यासोबत माझेही नाव घेतले गेले. त्यामुळे ते अस्वस्थ होते,” असेही पवार म्हणाले.

राजकारण गलिच्छ स्तर

शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, काकांसारख्या (शरद पवार) व्यक्तीला काहीही दोष नसताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा काहीच सहभाग नसताना त्यांची चौकशी केली जाते, ही राजकारणाची पातळी घसरली आहे. आपण यातून बाहेर पडलेले बरे, आपण शेती किंवा व्यवसाय करू. हे राजकारण गलिच्छ स्तराचे आहे, असे अजित पवारांनी त्यांच्या घरी सांगितले असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र, मी त्यांच्याशी या संदर्भात बोलेन, कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवार नॉट रिचेबल

अजित पवार यानी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ,संपर्क होत नाही. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून या प्रकरणात लक्ष घालणार आहे. ती माझी जबाबदारी आहे, असेही शरद पवार म्हणाले. काल, परवा आम्ही सोबत होतो. निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार ठरवतानाही ते होते. तिथेही त्यांची मते त्यांनी ठेवली, असेही पवार यांनी सांगितले.

मेलद्वारे अजित पवारांनी दिला राजीनामा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२७ सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. बागडे कार्यालयात नसल्याने त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. बागडेंना फोन करून याची माहीती दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, रेणू शर्मा प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया

News Desk

विधानसभाध्यक्षांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

swarit

परमबीर सिंह भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

News Desk