HW News Marathi
राजकारण

तावडेंनी घेतली ठाकरेंची भेट

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर स्थित कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. या भेटीत दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. चर्चा नक्की कशासाठी झाली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु ठाण्यामध्ये होणा-या नाट्यसंमेलनाचे आमंत्रण तसेच इतर राजकीय चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

या भेटीमागे ठाणे शहरात भरणा-या नाट्यसंमेलनाचे निमित्त असल्याचे बोलले जात आहे. तावडे त्या नाट्यसंमेलनाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटले हे प्रमुख कारण असले तरी इतर राजकीय चर्चा सुद्धा झाली असावी असा तर्क जोडला जात आहेत. कोकणातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या भाजप आणि शिवसेनेतच एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने ठाकरे तावडे भेट महत्वपूर्ण समजली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोचिंग क्लासेसचे मालक आणि तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

News Desk

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk
महाराष्ट्र

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk

पालघर | तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रियेत डावल्यामुळे स्थानिकांनी प्रकल्पाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही त्यांना भरतीपासून दूर ठेवल्याचा आरोप स्थानिकांनी करुन वाहनांची तोडफोड केली आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सध्या भरती प्रकिया सुरू झाली आहे. या स्थानिक तरुणांनी नोकरीसाठी कॉल केले होते. परंतु भरतीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरील लोकांना या भरती प्रक्रियेत प्राधांन्य देत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरुन, प्रकल्पासाठी जाणाऱ्या वाहनांना अडवीत आहेत. या व्यतिरीक्त बसच्या काचाही फोडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related posts

तर निर्भयासारखी प्रकरणे घडतील…

swarit

‘अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू!’

News Desk

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk