HW News Marathi
मुंबई

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी रद्द करण्याची मागणी

मुंबई | रमजानच्या निमित्ताने शासनाच्या अतिथीगृहावर इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. ही इफ्तार पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुस्लीम शाखे तर्फे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी या इफ्तार पार्टीवर आक्षेप घेतला असून ही पार्टी रद्द करण्याची मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सह्याद्री अतिथीगृह हे शासकीय मालमत्ता असून या ठिकाणी कोणत्याही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांस परवानगी नाही. या सह्याद्री अतिथीगृहाचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

मुंबईकरांसाठी आजचा दिवस अपघाताचा ठरला

News Desk

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk
राजकारण

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

मुंबई | “माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणा-यांनी माझ्यावर हा हल्ला केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हा प्रकार घडला आहे,” असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्रयांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले असून आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रामदास आठवले यांच्यावर शनिवारी (८ डिसेंबर) रात्री अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात एका तरुणाने हल्ला केला. या संपूर्ण प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.

रामदास आठवले हे शनिवारी संविधान गौरव दिनानिमित्त अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात हजर राहिले होते. रात्री १० च्या सुमारास हा कार्यक्रम संपल्यानंतर आठवले मंचावरून खाली उतरत असताना एका तरुणाने त्यांच्या अंगावर धावून येत त्यांच्या कानशिलात लगावली. या तरुणाचे नाव प्रविण गोसावी असे असून रामदास आठवलेंच्या समर्थकांनी या तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून या तरुणाने रामदास आठवलेंवर हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हा तरुण त्याच्या सोशल मीडियावर देखील आठवलेंच्या विरोधात बरेच लिहीत होता अशी देखील माहिती मिळत आहे. आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Related posts

२०१९ अखेर पुण्यात मेट्रो धावणार !

News Desk

वनखात्याला अवनी वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती !

Gauri Tilekar

लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर

News Desk