HW News Marathi
Uncategorized

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

पुणे : पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडणे या गोंधळामुळे मतदानाला विलंब झाला. या सर्व गोंधळाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे कारण सांगून पुण्यातील मुक्त पत्रकार राजेंद्र सोनार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली.

सोनार यांनी न्यायदंडाधिकारी एम. डी. मेश्राम यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. लोकसभा पोट निवडणुकीत झालेला गोंधळ हा समाजातील शांतता नष्ट होऊन अशांतता निर्माण होऊ शकते या सर्व कारणामुळे राजेंद्र सोनार यांनी ही याचिका दाखल केली. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार भा.द.वि. कलमा १७१ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार !

News Desk

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण, पुढं जाऊन संसार कसा होणार ?

News Desk

बिल्डर डीएसकेंची अटक अटळ

News Desk