HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

पालघर | दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पालघर येथील पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगलाय असताना आता काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आज (बुधवारी) सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ पालघर जिल्हाधिका-यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. रविवारी २० मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जाहीर सभा झाल्या. यावेळी भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा जाहीर केल्या असून, हा आचार संहितेचा भंग असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे.

  • काय म्हणालेत सचिन सावंत

२० मे रोजी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या नालासोपारा आणि कासा येथे दोन जाहीर सभा झाल्या. या सभेमध्ये वसई विरार महापालिका हद्दीतून २१ गावांचा हरित पट्टा वगळू, पालघर जिल्ह्याला मेडिकल कॉलेज डोके जाईल, तसेच जुन्या काळातील सर्व खावटी कर्ज माफ करून नवीन कर्ज दिले जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. हा आचार संहितेचा भंग असून, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अजून गुन्हा दाखल होत नसल्याने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी पत्र दिले असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दसऱ्याला पंकजा मुंडे करणार शक्तीप्रदर्शन

Gauri Tilekar

काश्मीरमध्ये कधी येऊ सांगा, राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना सवाल

News Desk

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ७ जणांचा मृत्यू तर २२ जखमी

News Desk

श्रीनगर | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. २२ मे रोजी पाकिस्तानने कथुआ जिल्हामधील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीएसएफच्या जवळपास ४० चौक्यांवर पाकिस्तानानने निशाणा साधला आहे. या हल्याला भारतीय लष्कराने मात्र चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात नागरीकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.

Related posts

सत्तेत असताना माझाही फोन टॅप झाला ही दुर्दैवाची गोष्ट !

swarit

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

News Desk