HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ७ जणांचा मृत्यू तर २२ जखमी

श्रीनगर | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. २२ मे रोजी पाकिस्तानने कथुआ जिल्हामधील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीएसएफच्या जवळपास ४० चौक्यांवर पाकिस्तानानने निशाणा साधला आहे. या हल्याला भारतीय लष्कराने मात्र चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात नागरीकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, कुलभूषण जाधववर भलतेच आरोप

News Desk

भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल – अदर पुनावाला

News Desk

मध्य रेल्वेने भंगार महसूलातून कमावले तब्बल 220 कोटी

Manasi Devkar