HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ७ जणांचा मृत्यू तर २२ जखमी

श्रीनगर | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. २२ मे रोजी पाकिस्तानने कथुआ जिल्हामधील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीएसएफच्या जवळपास ४० चौक्यांवर पाकिस्तानानने निशाणा साधला आहे. या हल्याला भारतीय लष्कराने मात्र चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात नागरीकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश,बंद झालेल्या कारखान्यातील ऊसतोड कामगार स्वगृही परतणार!

Arati More

बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल – संजय राऊत

News Desk

वासराशी महिलेचा विवाह

News Desk
राजकारण

योगी आदित्यनाथ आज पालघरमध्ये

News Desk

पालघर | दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुक येत्या २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावल्याचे पहायला मिळत. विषेश म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पालघरमध्ये या पोटनिवडणुकीला विषेश रंगत आली आहे. त्यातच कॉंग्रेसचे राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पालघर पोटनिवडणुकीत तगडी चुरस पहायला मिळणार आहे.

शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना या लोकसभा पोटनिवडणुत सीट दिल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या अनेक वरीष्ठ नेत्यांनी वनगांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तसेच भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावितांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी बुधवारी पालघर मध्ये उपस्थित रहाणार आहेत. बुधवारी सायंकाळी विरार पुर्व येथे सभा घेऊन ते मतदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. सभेनंतर लगेचच योगी आदित्यनाथ दिल्लीला जायला निघणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Related posts

राजस्थानमध्ये भर रस्त्यात सापडले बॅलेट युनिट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk

पवारांची मुलाखत चोरूनही पाहिली नाही – उद्धव ठाकरे

News Desk

मुकेश अंबानी आणि मोदींमध्ये दुरावा, काँग्रेसशी जवळीक ?

News Desk