HW News Marathi
Covid-19

विद्यार्थी, श्रमिक आपापल्या घरी लवकर पोहोचणार

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिकांसाठी विशेष ट्रेन केंद्र सरकारने रवाना केल्या आहेत. आज (२ मे) पटणा येथील दानापुर स्टेशनवर १२०० लोकांना घेऊन एक ट्रेन पोहोचली आहे. या सर्व प्रवाशांची रेल्वेच्या शाळेत वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे दिल्लीवरून ४० बस कोटाल रवाना झाल्या आहेत. कोटामध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थांना आणण्यासाठी ही बस रवाना झाली आहे. यात एका बसमध्ये २० विद्यार्थ्यांचं बसविण्यात येणार आहे. बसमध्ये बसण्याआधी आणि दिल्लीला उतरल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

News Desk

१२वीचा १५ जुलैपर्यंत आणि १०वीचा जुलै अखेरीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता

News Desk

…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते ! राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

News Desk