HW News Marathi
Covid-19

…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते ! राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई । राज्यात सत्ताधारी आणि विरोधक ह्यांच्यात जुंपण्यासाठी आता काही विशेष कारण लागत नाही. भाजप आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये दरदिवशी ह्या ना त्या कारणाने वाद विवाद होतच असतात. भाजप बोचऱ्या आणि अत्यंत जहरी टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये एक नाव आहे भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकर यांचे. दरम्यान, आता मात्र खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतुल भातखळकर यांच्याविषयी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना राज ठाकरे अतुल भातखळकरांविषयी म्हणाले की,”आमदार अतुल भातखळकर हे माझ्याकडे मनसेचे तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितले होते.”

अतुल भातखळकर यांचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे मनसेचे विधानसभेचे तिकीट मागायला आले होते. आणखी एक भाजपचेच लोखंडे म्हणून होते तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितले की, ‘ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात त्या पक्षाबाबत फक्त राग आला म्हणून हा वेडपटपणा करू नका. आहात तिथेच रहा’. मी हे त्यांना सांगत असताना आणखी दोन माणसे तिथे होती. मी साक्षीदार म्हणून त्यांना उभे करू शकतो. हे असे घडतच असते. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले. सोडून जातात तेव्हा ते एकटे असतात”, असे राज ठाकरे म्हणाले.

जे सोडून गेले त्यांच्याबद्दल…!

राज ठाकरेंच्या सोबतची अनेक माणसे त्यांना सोडून गेली आहे. ह्यावरून राज ठाकरेंवर अनेकदा बोचऱ्या टीकाही होतात. या मुलाखतीत याच मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, “जे सोडून गेले त्यांची एक दिवसांची बातमी होते. जे सोडून गेले त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं. माझ्यासाठी आले पण स्थानिक गोष्टींसाठी सोडून गेले. सुरूवातीच्या काळात माणसं सोडून गेली नाहीत, असा एकतरी राजकीय पक्ष आहे का? शिवसेना असो, भाजपा असो कुणीही”, असे राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठेही ‘म्युकरमायकोसिस’वर मोफत उपचार नाहीत, सरकारची घोषणा फसवी ! फडणवीसांचा आरोप

News Desk

दिलासादायक बातमी ! बीड जिल्हा झाला कोरोनामुक्त

News Desk

महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक! लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल… कुठे काय सुरु काय बंद? जाणून घ्या

News Desk