HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडीचे सरकार अंतर्विरोधामूळेच पडले, चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या (२६ सप्टेंबर) गुप्त भेटीमुळे राज्याच्या वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राऊत आणि फडणवीस यांच्यात सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यातच हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“संजय राऊत आणि देवंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची भेट झाली की नाही याची मला माहिती नाही. राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधुनमधून भेटत असतात त्याचा अर्थ त्यात काही उद्देश आहे आणि त्यातून बातमी निर्माण होईल असं नाही. भाजप कार्यकर्त्यांचे एक मोठे वेबिनार होते, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.”

“गेल्या नऊ महिन्यांत चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कुठल्याच नेत्यांनी हे सरकार जाणार आणि आमचं सरकार येणार असं म्हटलेलं नाही. हे सरकार जाण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. मात्र, आम्ही म्हणतो की हे सरकार अंतर्विरोधामुळं पडेल, पण जेव्हा पडेल तेव्हा पडेल आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जाचाला कंटाळून अपंग कुटुंबाचं उपोषण

News Desk

दोन वर्षे विद्यार्थीनीचा विनयभंग करणारा अटकेत

News Desk

महाविकासआघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका! – शरद पवार

Aprna