HW News Marathi
महाराष्ट्र

“पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय” नितेश राणेंचा आरोप!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून देशासह राज्यावर करूनच संकट असल्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती मात्र आता परिस्थिती थोडी निवळत असल्यामुळे विरोधकांनी गणेश उत्सवाचा मुद्दा लावून धरला आहे. राज्यात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला आहे.

ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला

राज्य सरकारने गणेशोत्सवा संदर्भात नियम जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने जारी केलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करतानाच मागण्यांचं निवेदन राज्यपालांना दिलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वच हिंदू सणांवर नियोजितपणे निर्बंद कसे टाकायचे यावर ठाकरे सरकारने भर दिला आहे. विविध सणांवर निर्बंध लावून सणाचे महत्व कसं कमी करायचं हाच किमान समान कार्यक्रम ठाकरे सरकारचा राहिला आहे. असंच दिसतंय. गणेशोत्सावासाठी जी नियमावली काढली, ती गेल्यावर्षीचीच आहे. फक्त तारीख बदललीय. या नियमावलीत सण साजरा करू नये असे नियम टाकले आहेत. गणेशोत्सवातील उत्साहाचं वातावरण मुंबईत असायचं. त्याला नियोजितपद्धतीने संपवायचं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप राणे यांनी केला.

याबाबतची माहिती राज्यपालांना दिली

जे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत आहेत. तेच काम उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि मुंबईत करत आहेत. हिंदू खतरे में है अशी परिस्थिती बंगालमध्ये होती. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात घडवण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. याबाबतची माहिती राज्यपालांना दिली आहे. त्यावर राज्यपालांनी तुम्ही तुमचं काम करा, मला काय करायचं ते मी करतो, असं आश्वासन दिलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो

या वर्षी सरकारने अति केलं आहे. घरात असलेल्या मूर्त्या सहा इंच करा आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी पालिकेचे लोकं घरी येणार असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या मिरवणुकाही बंद करण्यात आल्या आहेत. हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो. काल बेस्टचा कार्यक्रम झाला. तिथे गर्दी होती. मुख्यमंत्रीही तिथेच होते. ती गर्दी दिसली नाही. मेट्रोच्या कार्यक्रमातील गर्दी दिसली नाही. पार्ट्या चालतात तेव्हा कोरोना दिसत नाही. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन झालं, तिथे कोरोना दिसला नाही. पण जिथे जिथे हिंदूंचे सण येतात तिथे तिथे या सरकारला कोरोना कसा दिसतो?, असा सवालही त्यांनी केला.

सर्व निर्बंध हिंदूंनाच लागू होतात

होर्डिंगवर गणेशोत्सव मंडळाचं आर्थिक गणित मांडलेलं असतं. त्या होर्डिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. होर्डिंग लावल्यावर कोणता कोरोना पसरतो? आणि कोणत्या कंपाऊडरने त्यांना सांगितलं याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी अन्य धर्मीयांचे सण झाले. पण त्या धर्माचे लोकं राज्यपालांना भेटले नाहीत. कारण त्यांच्यावर निर्बंध नव्हते. सर्व निर्बंध हिंदूंनाच लागू होतात. हे कुठे तरी बंद झालं पाहिजे, अशी मागणी राज्यपालांना केली आहे. ठाकरे सरकार हिंदूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवसाहेब ‘हा’ खेकडा तर शिवसेना पोखरत आहे !

News Desk

बीड जिह्यात अंबाजोगाई नगरपालिकाचे प्रभारी नगर अध्यक्ष राजकिशोर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता !

News Desk