HW News Marathi
देश / विदेश

भारताने जर कोणाला मैत्रीची हात दिला तर तिसऱ्या देशाच्या विरोेधात आहे असं होत नाही!

नवी दिल्ली | जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. जगाने एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढायची वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात तातडीने बदल करण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातल्या भाषणात काल (२६ सप्टेंबर) केली. आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून कोविड-१९ सारख्या जागतिक संकटाच्या काळात UN ने काय प्रतिसाद दिला, हे तपासण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UN च्या ७५ व्या आमसभेच्या निमित्ताने आभासी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचं भाषण झालं. चीनचे राष्ट्रप्रमुख आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनंतर भारतीय पंतप्रधानांचं भाषण होणार असल्यामुळे त्याकडे होतं. मोदींच्या भाषणाचा रोख प्रामुख्याने विकासाभिमुख राहिला. पण जागतिक शांततेसाठी भारत कटिबद्ध आहे, हे मोदींनी सांगितले आहे.

मोदी म्हणाले, “भारताने जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत जेव्हा विकासाचं सहकार्य कायम ठेवतो त्यावेळी त्याच्यामागे कोणत्यातरी सहकारी देशाला बळजबरी करण्याचा विचार नसतो. आम्ही आमच्या विकासाच्या प्रवासात मिळालेला अनुभव शेअर करायलाही मागेपुढे पाहत नाही”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिमाचलमध्ये सहा जण जमिनीखाली गाडले गेले

News Desk

माझा छळ कशासाठी?

News Desk

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’विमानतळ करण्यास मान्यता !

Arati More