HW News Marathi
महाराष्ट्र

वेळोवेळी पाठ पुरावा केल्यामुळेच ‘वैद्यनाथ’ला थकहमी मिळाली, इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही – पंकजा मुंडे

मुंबई | मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नाव न घेता कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना प्रतिउत्तर दिले आहे.

मंगळवारी २२ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला १० कोटी ७७ लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल पंकजा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कब्रस्थानाच्या दो गज जमीनीसाठी दोघाची दिल्ली पदयात्रा !

News Desk

उजनीच्या हक्काच पाणी सोलापूरचंचं!भरणेंविरोधात शेतकऱ्याचं धरणात उतरून आंदोलन

News Desk

चक्रीवादळामुळे झालेली नुकसाभरपाई द्यावी – फडणवीस

News Desk