HW News Marathi
राजकारण

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत !

मुंबई | कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक मदतीची हक्क दिली. प्रत्येक व्यक्तींनी त्यांच्या पात्रतेनुसार १०, ५० आणि १०० रुपये दिले. मदतीसाठी रस्यावरून नागरिकांनी पैसे मागतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खासदार संभाजीराजेंनी संतापव्यक्त करत तावडेंवर निशाणा साधला.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी विनोद तावडे यांना सुनावले आहे. त्यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. “स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारले आहे.”

“भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत आहे ही”, असे म्हणत तावडेंनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत संभाजीराजेंच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचे प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

News Desk

सरकारने जनतेच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी | अजित पवार

News Desk

आता एमआयएम करणार हर्षवर्धन जाधवांच्या मदतीची परतफेड

News Desk