HW News Marathi
मुंबई

बाबासाहेबांना अनोख अभिवादन

मुंबई | देश व राज्यातील वातावरणतसेच जनतेचा सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला भ्रमनिरास याविषयी जनजागृती करण्यासाठी १४ एप्रिल पासून वर्षभर राज्यभरात वोट हमारा ,राज हमारा मतदार जनजागृती तसेच संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात येत असल्याची घोषणा 14 एप्रिल रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने करण्यात आली .

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी महाराष्ट्रच्या वतीने हारफुलांऐवजी एक वही एक पेन अर्पण करून चैत्यभूमी दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली .यावेळी महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात , सुनील गायकवाड,रणधीर आल्हाट ,अविनाश गायकवाड , नेहाताई शिंदे ,ऍड .रत्नाकर डावरे, सीताराम लव्हांडे, संतोष वाकळे ,प्रितेश चितळे , वर्षाताई कांबळे,विजय कांबळे , दीपक जगदेव,सुनील वाकोडेयांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी आपल्या या अभियानाची घोषणा केली.

राज्य तसेच देशातील मागासवर्गीयांसह सर्वच मतदारांच्या अपेक्षा केंद्र तसेच राज्य सरकारने काही अंशी पूर्ण करण्याच्या अपेक्षा असताना या दोन्ही सरकारकडून जनतेचा अपेक्षभंग झाला असल्याची नाराजी कांबळे यांनी व्यक्त केली . दलित मागासवर्गीय, मुस्लिम , महिला विद्यार्थी या देशात सुरक्षित राहू शकत नाहीत हे ताज्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे , नोक-या नसल्यामुळे सुशिक्षित तरुण भरकटत चालला असून महागाईनेही उच्चांक मोडला आहे .मराठा समाज आरक्षण ,शेतकरी कर्जमाफीच्या केवळ होत असलेल्या घोषणा , मंत्रालयाचे झालेले आत्महत्यालय तसेच सरकारमधील सहकारी पक्षामध्ये देखील नसलेला ताळमेळ यामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असून यापुढे त्यांच्या एका मताची किंमत काय आहे, आपले एक मत काय करू शकते, भारतीय संविधानाने जनतेला काय अधिकार दिलेले आहेत याविषयी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका व गावस्तरावर “हमारा वोट, हमारा राज” असे मतदार जनजागृती तसेच संविधान साक्षरता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

विमानतळावर 15 किलो सोनं जप्त

swarit

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk
मुंबई

शेलार, ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात

swarit

मुंबई | भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे झाली. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदसत्यात आहे. या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी गुढीवाडव्याच्या जाहीर सभेत आगामी निवडणुकीत ‘मोदी मुक्त भारत करायला हवा’ अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला होता. राज ठाकरे हे मोदींवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. मग आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरही त्यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उचावल्या आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोघांपैकी कोणी स्वत:हून काही बोलत नाही, तोपर्यंत यांच्या भेटीवर राजकीय चर्चा रंगणार आहे. पण दोघांपैकी यांचे भेटीचे गुप्त पहिले कोण उघड करणार याकडे

 

Related posts

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

News Desk

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk

मालाडमध्ये पार्किंगच्या वादातून सात गाड्या पेटविल्या

News Desk