HW News Marathi
महाराष्ट्र

बाजार सुरू करू शकता मग कांदा निर्यात बंदी का? शरद पवारांचा केंद्राला सवाल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मराठा आरक्षण असो किंवा कृषी विधेयक असो, सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. दरम्यान, केंद्र सरकारने अचानक केलेल्या कांदा निर्यात बंदीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर बाजार खुला केला जाऊ शकतो मग कांदा निर्यात बंदी का केली असा प्रश्न यावेळी केंद्र सरकारला शरद पवारांनी विचारला आहे.

तसेच, केंद्र सरकारच्या कृषि धोरणात विरोधाभास असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार, त्यांच्या सोबत सहभागी होणार असल्याचेही या परिषदेत शरद पवारांनी स्पष्ट केले. तसेच आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’ ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”, राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर

News Desk

पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करणा-या भाजप मंत्र्याची मस्ती जनताच उतरवेलः सचिन सावंत

News Desk