HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?पवारांनी सुनावलं!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अनेक नेते करत होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही गंमत आहे का? राज्यात बहुमत आहे,अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. आज (२२ सप्टेंबर) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील महाविकासआघाडी सरकार अपयशी असून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नारायण राणे,खासदार रामदास आठवले, अभिनेत्री कंगणा राणावत यांनी केली होती. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत केली होती. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा. त्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला होता. शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. मात्र या परिस्थितीतही ते राज्यभर फिरतात. विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात, असे राणा यांनी म्हटले होते.त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागक्षी करणाऱ्या सगळ्यांना पवारांनी सणसणीत टोला लगावला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची पूर्ण तयारी! तर ‘ते’ पत्र कधीचं, राजेश टोपेंकडून खुलासा!

News Desk

चंद्रकात पाटील माफी मागा,राष्ट्रवादी आक्रमक !

News Desk

योगी आदित्यनाथ सरकारचा दावा चुकीचा? वाढत्या गुन्हेगारीची आकडेवारी आली समोर!

News Desk